Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


ज्ञानरचनावाद

ज्ञानरचना वाद (knowledge constructivism)

प्रस्तावना
शिक्षण क्षेत्रात ज्ञानरचनावाद शब्द वारंवार वापरला जातोया शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावतअसतोकाही म्हणतात शाळेत साधने वापरून कृतियुक्त शिक्षण देणेतर काही रचनावाद येण्याआधी पासून आम्ही तुम्हीसांगता त्या गोष्टी करतच होतोतुम्ही त्याला फक्त नाव दिले. काहीजण वर्तनवाद विरुद्ध रचनावाद अशी मांडणी करतात 
रचनावादपूर्वीचे शिकण्याबाबतचे सिद्धांत खालीलप्रमाणे.
कोरी पाटी सिद्धांत
मुलाचे मन म्हणजे कोरी पाटी त्यावर आपण हवे ते लिहू शकू (मूल म्हणजे मातीचा गोळाअसा सिद्धांत. बाहेरच्या जगाचेप्रतिबिंब मुलाच्या रिकाम्या मनावर उमटणे म्हणजे मूल शिकणे अशी कल्पना होतीपण हळूहळू लक्षात आले की प्रत्येकमुलाला आपल्याला हवे तेहवे तसेहवे तेव्हा शिकवता येईलच असे नाहीएकाच वातावरणात वाढणारी किंवा एकाचशिक्षकाकडून शिकणारी सगळीच मुले सारखी शिकत नाहीतजर मुलांची मने म्हणजे कोर्या पाट्या असत्या तर मुलांच्याशिकण्यात असा फरक पडायचे कारण नाही
वर्तनवाद  सिद्धांत
मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या लोकांना भोंगळ वाटायला लागली कारण मनाच्याअस्तित्वाचा  स्वरूपाचा पुरावा देणे शक्य नव्हतेआपण एखाद्याच्या मनाबाबत जे आडाखे बांधतो ते त्याच्या वर्तनाच्याआधारे बांधतो. (उदा. नितीनचे मन उदास आहे याचा आडाखा आपण तो तोंड पाडून बसलायबोलत नाहीये असे त्याचे वर्तनपाहून बांधतो.) कारण वर्तनाचे त्रयस्थपणे निरीक्षण करता येते.त्यामुळे मग वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र अशीव्याख्या केली जाऊ लागली.
वर्तनाचा अभ्यास करण्याच्या काळात प्राण्यांचे वर्तन अभ्यासण्याचे अनेक प्रयोग मानसशास्त्रज्ञांनी केले आणि प्राण्यांचे वर्तनआपल्याला हवे तसे बदलता येते हे सिद्ध करून दाखवलेवर्तनात बदल घडवण्याचे त्यांचे साधन होते बक्षिसे आणि शिक्षा !एखादे वर्तन केल्यावर बक्षीस मिळाले तर प्राणी ते वर्तन पुन्हा पुन्हा करतो आणि शिक्षा मिळाली तर ते वर्तन करत नाही अशीही ढोबळ  सहज दिसणारी मांडणी होती आणि म्हणून मग मुलाच्या वर्तनात शिक्षकाला अपेक्षित बदल घडणे म्हणजे शिकणेअशी शिकण्याची व्याख्या अस्तित्वात आली.
वर्तनातील हा बदल कायमस्वरूपी टिकावा यासाठी पुन्हा पुन्हा सराव करणे गरजेचे आहे हेही लक्षात आलेप्राणिल स्वरूपाच्यागोष्टी मूल कसे शिकते हे सांगण्यात वर्तनवाद कमालीचा यशस्वी झालामात्र माणसाच्या मुलाचे शिकणे प्राण्यांपेक्षा कमालीचेगुंतागुंतीचे असतेत्याचे समग्र स्पष्टीकरण वर्तनावादाच्या आधारे करणे कठीण होऊ लागलेमूल मातृभाषा कशी शिकते हेसांगताना वर्तनवादी सिद्धांत अगदीच तोकडा पडू लागलामाणसाची भाषा ही एक अत्यंत गुंतागुंतीची चिन्हप्रणाली आहे.जगातल्या खर्या वस्तूक्रियाभावनावस्तूचे गुणधर्म असे बरेच काही शब्दांच्या चिन्हांनी आपण दाखवत असतोभाषेतीलशब्द आणि तिच्या व्याकरणाचे नियम वापरून आपण मनातल्या मनात विचार करू शकतोमातृभाषेचे नियमव्याकरण,जटिल वाक्य-रचना एखादे दोनतीन वर्षांचे मूल कसे शिकतेभाषा वापरून आपण विचार कसा करू शकतोयाचे उत्तरवर्तनवादी सिद्धांताला देता येईना.
आकलनवाद
वर्तनवादी शास्त्रज्ञ भाषेकडे आणि विचारप्रक्रियेकडे फक्त एक वर्तन म्हणून पाहत असतकारण विचार-प्रक्रिया अभ्यासायची तरमनाचे आणि मानसिक प्रक्रियांचे अस्तित्व मान्य करायला लागणार आणि ते नाकारूनच तर वर्तनवादाची सुरुवात झालीहोतीया प्रश्नावर तोडगा म्हणून आकलनवादी विचार मांडले गेलेमूल भाषा कशी शिकतेहे केवळ अभिसंधान प्रक्रिया वापरूनस्पष्ट करणे अशक्य आहे अशी मांडणी नोआम चॉम्स्कीसारख्या भाषातज्ज्ञाने केलीमाणसाची विचारप्रक्रिया म्हणजे वर्तननाहीतर विचारप्रक्रियेचा प्रभाव वर्तनावर पडतोविचारप्रक्रिया ही मानसिक पातळीवर चालणारी क्रिया असल्याने,आकलनवादासोबत मानसिक-अवस्था  मानसिक-प्रक्रिया यांना मानसशास्त्राच्या अभ्यासात परत स्थान मिळालेइथे एकलक्षात घेतले पाहिजे की आकलनवाद्यांनी वर्तनवाद पूर्णपणे नाकारलेला नाहीमात्र तो शिकण्याची समग्र प्रक्रिया उलगडण्यासतोकडा आहेअसे सप्रमाण दाखवून दिले आहे.
Image result for teaching learning imagesज्ञानरचनावाद
ज्ञानरचनावादी  शिक्षण  प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे, जोहनड्य़ूई,वायगोटस्की ,ब्रुनर  या शास्त्रज्ञानी विचार मांडलेले आहेत.नव्याअनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्यापूर्वानुभवाच्या आधारे अर्थ लावून समजवून घेणेया भूमिकेवरज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे . हा मुलांच्या शिकण्याच्याप्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे.
फ्रान्सचे जिन पियाजे Jean Piage यांनी ज्ञानसंरचनावादाचीसंकल्पना मुलांच्या वाढत्या वयाबरोबर वाढणाऱ्या त्यांच्याआकलनशक्तीशी जोडली. त्यांनी मुलाच्या जन्मापासून ते पंधरा वर्षांपर्यंत चार गट केले आहेतया प्रत्येक गटात मुलांच्याविविध आकलनशक्तीचा विकास होत जातोबालकांच्या वृध्दिंगत होणाऱ्या या गुणांचा आपल्या अनुभव आहेजन्मापासूनआपल्या देहबोलीतूनकृतीतूनबोलण्यातून प्रत्येक बालक आपल्याला त्याच्या वाढत्या ज्ञानसंरचनेची चुणूक दाखवतो.
लेव वायगोस्कीच्या संकल्पनेप्रमाणे बालकांवर त्याचे आजूबाजूची परिस्थितीपरिसर,संस्कृतीशिक्षक आणि मुख्य म्हणजेत्याच्या मित्रपरिवाराचा मोठा प्रभाव पडत असतोवेळेनुसार या सर्वाना तो स्वत:च्या अनुभवाची जोड देऊन स्वत:ची ज्ञानाचीरचना करीत असतोयाचे उत्तम उदाहरण द्यायचे म्हटले तर शहरातील मुले लहान वयातच रिमोट कंट्रोलमोबाइल आणिआता संगणक आपणहून शिकतातत्यांना हे कोणी वेगळे शिकवण्याची गरज लागत नाहीत्याच वेळी ग्रामीण भागातलामुलगा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे जंगलाचीशेतीची अथवा वंशपरंपरागत इतर कौशल्याच्या गोष्टी शिकतअसतोया त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत आजूबाजूची नैसर्गिक आणि सामाजिक परिस्थितीसंस्कृती यांचा प्रभाव पडतअसतोमुलांच्या संरचनेत त्यांच्या मित्रपरिवाराचा प्रभाव निश्चितच पडतोघरापासून ते शाळेपर्यंत जाण्यायेण्याच्या प्रवासातमुले जे ज्ञान शिकतात ते शाळेच्या कुठल्याही अभ्यासक्रमात वा पाठय़पुस्तकात नसतेमुलांच्या विश्वात विविध प्रकारच्याज्ञानाची सतत देवाणघेवाण होत असतेहल्लीच्या काळात दूरदर्शन वाहिन्यानेटसर्फिगफेसबुकसारख्या मनोरंजक आणिमाहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुले प्रचंड माहिती मिळवत असतात आणि आपापल्या परीने प्रत्येकजण स्वत:चीज्ञानसंरचना करीत असतो
मूल आपल्या मनातील जगाबाबतच्या धारणा आणि परिसरातून मिळणारा अनुभव यांच्यातील आंतरक्रियेतून स्वत:च्याज्ञानाची रचना करतो हा रचनावादाचा मध्यवर्ती विचार आहेमूल अगदी जन्मापासून अवतीभोवतीचे जग समजून घेण्याचाप्रयत्न करतेवस्तू मुठीत पकडणेतोंडात घालणेवस्तू एकटक न्याहाळणे ही मुलाची जग समजून घेण्याची धडपड आहे असेज्ञानरचनावादात मानले जातेएकदा का मुलाला भाषा अवगत झाली की ज्ञानाची रचना करण्याला मोठीच गती मिळते.शब्दांच्या आधारे मूल नव्या नव्या धारणा बनवते आणि अनुभव वाढला की बनलेल्या धारणा मोडून पुन्हा नव्याने बनवते. ‘पुरुष’ या शब्दाची एका मुलाची धारणा वाढत्या अनुभवाबरोबर कशी बदलत जाऊ शकतेयाचे पियाजेंनी दिलेले उदाहरणआपण पाहू याअर्थातच एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे हे काहीसे ढोबळ वर्णन आहेहे लक्षात घेतले पाहिजे.
1सुरुवातीला बाबा या शब्दाचा अर्थ पुरुष या शब्दासारखाच असतोत्यामुळे सर्व पुरुषांसारख्या दिसणा-या व्यक्तींना मूल बाबाम्हणते.
2हळू हळू त्यातून आजोबादादा असे वयानुसार पडणारे काही गट वेगळे होतातमग त्या त्या वयोगटातील व्यक्तींना मूलदादा वा आजोबा म्हणू लागतेया टप्प्यावर पुरुष या धारणेत किमान आजोबाबाबा  दादा असे तीन गट आहेत.
3काकामामा अशी नाती लक्षात येऊ लागली म्हणजे मुलाची पुरुष या गटाची धारणा अधिक विस्तारते.
4हळू हळू वाढत्या अनुभवाबरोबर पुरुष या शब्दाची मोठ्या माणसांच्या धारणेसारखी धारणा मूल बनवते.
ज्ञानरचनावादाचे पैलू
मुले आपल्या ज्ञानाची रचना स्वतकरतातयासाठी त्यांना विविध समृद्ध अनुभव मिळणे गरजेचे आहे.
हाताने करून शिकणे हा ज्ञानरचनावादातील महत्त्वाचा भाग आहे.
मुलांच्या चुकांकडे त्यांच्या शिकण्यातली महत्त्वाची पायरी म्हणून पाहायला हवेज्ञानरचनावादात मुलांच्या व्यक्तिगतविचाराला आदराचे स्थान आहे.
मुलांच्या ज्ञानरचनेत मोठ्यांच्या सहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहेमुलाला शिकण्याच्या विशिष्ट टप्प्यावर कायआणि कशी मदत करावी याचे भान शिकवणा-या माणसाला असावे लागते.
1. पिंज-यात बंद असणार्या एखाद्या उंदराला कळ दाबल्यावर अन्न मिळते हे अपघाताने समजलेतर तो हवे तेव्हा कळ दाबूनअन्न मिळवायला शिकतोकळ दाबणे हे वर्तन अन्नाच्या बक्षिसामुळे उंदीर पुन्हा पुन्हा करतोकाही काळाने जर वारंवार कळदाबून अन्न मिळाले नाही तर तो कळ दाबणे बंद करतोकळ दाबणे आणि अन्न मिळणे यात जो संबंध जोडला जातो त्यालाअभिसंधान किंवा Conditioning असे म्हणतात.वर्तनवाद्यांच्या मते अभिसंधान ही शिकण्यातील प्रमुख प्रक्रिया आहे.
2. तीन वर्षांच्या आयुषचे हे वाक्य पाहा - ‘इथे झुरळ मरले आहे बघ.’ या क्रियापदाचे ‘मरले’ असे भूतकाळातील रूप केले आहे.अर्थातच त्याच्या आसपासचे कोणीच हे रूप वापरत नाहीसगळेजण ‘झुरळ मेले’ असे रूपच वापरतातमात्र लहानग्याआयुषच्या मनात मराठीचे व्याकरण आकार घेते आहेत्यामुळे त्याने बसलेउठले यासारखे मरले असे रूप बनवले आहे.कोणीही कधीही  वापरलेले हे क्रियापदाचे रूप आयुषला कसे सुचले याचे स्पष्टीकरण वर्तनवादी सिद्धांताच्या आधारे देता येतनाही.
3. सहावीच्या वर्गात गुरुजींनी ऋण संख्या शिकवल्यापूर्णांक संख्यांची बेरीज-वजाबाकी शिकवली आणि मुलांना उदाहरणेसोडवायला दिलीत्यांना असे दिसले की बर्याच जणांचा ऋण संख्यांच्या बेरीज-वजाबाकीत तर गोंधळ उडालाचपण गंमतम्हणजे - = ? यासारख्या उदाहरणातही मुलांनी चुका केल्या होत्याइयत्ता सहावीत येईपर्यंत सहजपणे येणार्यावजाबाकीत मुलांनी का चुका केल्या ? आतापर्यंत नैसर्गिक संख्याच्या आधारे वजाबाकीची जी धारणा मुलांनी बनवली होती तीपूर्णांक संख्यांच्या वजाबाकीच्या नियमांमुळे मोडून पडली आणि त्यामुळे आता वजाबाकीची नवीन धारणा बनेपर्यंत मुलांचास्वाभाविकपणेच गोंधळ झालाही नवी धारणा बनेपर्यंत मुलांना वेळ द्यायला हवा असे ज्ञानरचनावादावर विश्वास असणाराशिक्षक़ म्हणेल.
4. एखादे मूल अपूर्णांक शिकते आहेअपूर्णांकांची मूलभूत कल्पना (आकृती पाहून अपूर्णांक लिहिणे वगैरे), अपूर्णांकाचे वाचन,लेखन या बाबी त्याला स्वतंत्रपणे येत असल्या तरी दोन अपूर्णांकांमधला लहान मोठेपणा ठरवायला त्याला लगेच जमेल असेनाहीकाही दिवस निरनिराळ्या अपूर्णांकांच्या जोड्यांवर शिक्षकांच्या मदतीनेशैक्षणिक साधने वापरून काम केले म्हणजे मगलहान-मोठेपणा ठरवणे मुलांना शक्य होऊ लागते.  
ज्ञानरचनावादाची  तत्वे 
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF2005), बालकांचा मोफत  सक्तीचा  शिक्षणाचा हक्क अधीनियम 2009 (RTE )मधील कलम  २९ मधेही ज्ञानरचना वादाची तत्त्वे आढळतात.d
1.ज्ञान हे स्थिती शील Static नसून गतिशील Dynamic आहे
2.मनुष्य स्वतः शिकत असतोआपल्या ज्ञानाची रचना करत असतो
3.पूर्वानुभवाच्या आधारे  मनुष्य  ज्ञान रचना करतो
4.सामाजिकभाषिक  सांस्कृतिक आंतरक्रीयेद्वारे ज्ञानाची निर्मिती होते
5.स्थानिक परिस्थितीचा / परिसराचा  मोठा वाट ज्ञान रचनेत असतो

ज्ञानरचनावादी वर्गाध्यापन

Image result for teaching learning imagesशिकण्याची प्रक्रिया ही पूर्व ज्ञान, शिकण्याची तयारी व अध्ययनअनुभवच्या सम्यन्व्यातून घडते.

पूर्वज्ञान - शिकवण्याची प्रक्रिया  हि सतत  चालणारी प्रक्रियाआहेत्यानुसार  या  संज्ञेचा  अर्थ  बालक  विशिष्ट नवीन  घटकशिकण्यापूर्वी  त्या घटका संदर्भातील त्याची  आधीची समज  असाघेता येईलवर्गातील प्रक्रियेत  शिक्षकाला  मुलाच्या पूर्वज्ञानाचा विचार करून  अध्ययन – अनुभवाची  निवड  रचना करावीलागेल .

शिकण्याची तयारी - शिकणाऱ्यांची  शिकण्याची  तयारीकरण्यासाठी त्याची  शिकण्याची  इच्छा   त्याची पात्रता  या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेतत्याचप्रमाणे  शिकतांना  त्याचीभावनिक अवस्था  कशा प्रकारची आहे  हेही  महत्त्वाचे ठरते. भावनिक स्थिरतेतून  भावनिक प्रसन्नतेकडे जाणारी  बालकांची मनस्थिती  हि शिकण्यासाठी  योग्य  स्थिती असते .

अध्ययन अनुभव - बालकाला  ज्या अनुभावाद्वारे  नवीन ज्ञान प्राप्त  होणर असते तो अध्ययन-अनुभवम्हणजे  जोअनुभव  आजवर  त्याने घेतलेला नव्हता असा अनुभवनवीनता हे त्यांचे वैशिष्ट आहे अध्ययन-अनुभव  जितके संख्येने जास्त,विषयाला/आशयाला सुसंगत   समर्पक असावेत.असे अध्ययन-अनुभव विचारपूर्वक विद्यार्थांना पुरवणे शिक्षकाचीजबाबदारी आहे. 

विद्यार्थ्यांचे  पूर्वज्ञान,त्यांची शिकण्याची तयारी  आणि अध्ययन-अनुभव यांचा  योग्य समन्वय वर्गामधील अध्ययन-अध्यापनप्रक्रियेमध्ये घडवून आणावा लागेलवर्गामध्ये शिक्षक  जे सांगतील  तसेच  विध्यार्थी  करतात .शिक्षक  बोलतात तेचविध्यार्थी  ऐकतात.जोडवर्ग,मोठे वर्ग,विषयांची संख्या,वेगवेगळया चाचण्याजोडीला एखादे  दुसरे अशैक्षणिक काम यापरिस्थितीमध्ये  वेळेत “पोर्शन “ संपवायची कसरत शिक्षक करत असतो.या प्रक्रियेत मुलांना  किती  समजले,त्यांना कायवाटते,कोणती  गोष्ट त्यांना  कठीण जातेत्यांना  काही अडले  आहे का,  यांसारख्या  गोष्टीना  वेळच मिळत नाही  किंवा दिलाजात नाही.लहान मुले  उपजतच बहुविध  क्षमतेची  असतात.ती त्यांच्या  अंगभूत  क्षमंतानुसार   गतीनुसार शिकतात  आणिवेगवेगळ्या  पद्धतीने  ज्ञानाच  उपयोजन करतात .बालमानसशास्र आणि शिक्षणशास्राने आपल्याला शिकवलेले हे  धडे वर्गावर्गात  मात्र दूर्लक्षिले  जातात .शालामंध्ये  बहुतेक वेळा व्याख्यानपद्धती,फलक लेखन,पाठांतर,सराव .गृहपाठ  याचाकोरीतून जाणे शिक्षकांना   त्याची सवय झालेल्या विद्यार्थीपालक यांना सोयीचे जाते.अशा पदधतीने  अनेक वर्ष शिक्षणाची प्रकिया  पार पडत आहे.परंतु याचा अंतिम निष्कर्ष मुले खरेच काही शिकतात काशिकत  नसतील,तर तोविद्यार्थ्यांचा  क्षमतेचाबुद्धीचा किवा शिक्षकांच्या  कौशल्याचा दोष मानला जातो,परंतु हे कितपत  खरे आहे ? दोष असेल  तरतो शिकवणे या  पूर्वापार  चालत आलेल्या  संकल्पनेचा  दोष आहे. हे आपण लक्षात  घेतले पाहिजेम्हणूनच  आपण शिकवणेयावर  लक्ष  काढून घेऊन ते शिकणे  यावर केंद्रित  केले पाहिजे.ज्ञानरचानावाद हि हेच सांगतो. 

1 comment: